'राष्ट्रवादी'चा जन्मच मुळात पाठीत खंजीर खुपसून झालाय-अनंत गीतेंचा घणाघात...

रायगड- शिवसेना आणि काँग्रेस कधीच एक होऊ शकत नाहीत, असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असा घणाघात राष्ट्रवादीवर केला आहे. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे, असे अनंत गीते म्हणाले. 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनी सेना नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी यावेळी केला.
 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठीची तडजोड असल्याची आठवण त्यांनी करून दिली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अज्ञात वासात गेलेले अनंत गीते पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.

-----------------------------------------------------






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :